गोंदिया(अनिल मुनिश्वर):–
जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात काही महिन्या अगोदर 29 नोव्हेबर 24 रोजी गोंदिया-कोहमारा मार्गावर वृंदावन टोला खजरी फाट्यावर शिवशाही बसला भीषण अपघात झाला. यात 11 जणांचा बळी गेला,18 जण गंभीर तर 12 जण किरकोळ जखमी झाले होते. त्या अपघाताची शाई वाळत नाही तोच आज 22 मार्च रोजी दुपारी 2 च्या सुमारास नागपूर-रायपूर महामार्गावर कोहमारा चौकात रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणार्या भरधाव ट्रकने गोंदियावरून नागपूरकडे जाणार्या शिवशाही बस क्रमांक एमएच 06 बीडब्ल्यू 0143 ला धडक दिली. सुदैवाने दुदैवी घटना घडली नाही, बसमध्ये 19 प्रवासी होते. चालक किरकोळ जखमी झाला. सुदैवाने प्रवासी सुरक्षित आहेत. अपघातात मात्र बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस व एसटीचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी ट्रकचालकाने ट्रकसह पोबारा केला…
मोठा अनर्थ टळला…


